NC Times

NC Times

राजलक्ष्मी ज्वेलर्सने ग्राहकांशी विश्वासाचे नाते जोडले-सौ पुजा पाटील


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- राजलक्ष्मी ज्वेलर्सने आपल्या वैविध्यपूर्ण दागिन्यांची उपलब्धता करत ग्राहकांशी अगदी विश्वासाचे नाते जोडले असल्याचे उदगार सौ पुजा विशालदादा पाटील यांनी कवठेमहांकाळ येथे राजलक्ष्मी ज्वेलर्सने नव्याने सुरू केलेल्या दालनाच्या उदघाटना प्रसंगी काढले.यावेळी श्रीक्षेत्र गिरलिंग देवस्थानचे मठाधिपती श्री कैलास भारती उर्फ बाळ महाराज व गणेश टेकडीचे मठाधिपती श्री आनंदगिरी महाराजांसह‌ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ पाटील पुढे म्हणाल्या की जाधव बंधुनी सुरू केलेल्या एकाच छताखाली विविध व्हरायटी मध्ये सोन्याचांदीचे दागिने मिळण्याचे दालन हे कवठेमहांकाळ शहराच्या वैभवात नक्कीच भर टाकेल असेही त्या यावेळी म्हणाल्या.यावेळी कैलास भारती महाराज व आनंदगिरी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष अजित माने,उपनगराध्यक्ष बद्रुद्हीन शिरोळकर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील,उद्योगपती निरंजन शेटे(हुपरी),सागर शहा (आष्टा),पुरषोत्तम बेंद्रे,महांकाली कलेक्शनचे प्रविण माळी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील,पांडुरंग पाटील,सुरेश पाटील नगरसेवक सोमनाथ लाटवडे,ज्ञानेश्वर भेंन्डे,राहुल जगताप,  ईश्वर वनखडे,राहुल कोठावळे,वैभव गुरव,अशोक जाधव, दत्तात्रय जाधव,सचिन जाधवसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.स्वागत प्रास्ताविक अशोक जाधव यांनी तर आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले.