नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) गावचे सुपुत्र माणिकराव भगवान जाधव यांची कोल्हापूर विभागीय मजूर सहकारी फेडरेशनच्या चेअरमनपदी तर कोल्हापूरच्या सौ श्रृतीका शिरीष करंबे यांची व्हा चेअरमनपदी एकमताने बिनविरोध निवडी करण्यात आल्या.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सांगली येथे संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आल्या.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती अनुष्का देशमुख यांनी काम पाहिले.
यावेळी संचालक सर्वश्री सुनील जाधव-पाटील (सांगली),सतिश देशमुख (कडेपूर),दिनकर पाटील (बिऊर), पोपट थोरबोले (पलूस),अविनाश आळतेकर (मिरज),नागेश गाडीवडर (शिरोळ),भिमराव घाटके (बुध),अरुण निंबाळकर (शिरोळ),सावित्री पाटील (दिंडनेर्ली),संजय मोहीते (कोल्हापूर) तसेच मानद सचिव धनाजीराव जगताप व कोल्हापूर विभागीय मजूर सहकारी संघाचे सभासद,संस्था प्रतिनिधी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणिकराव जाधव हे राजकारणातील आभ्यासु व अगदी भुजर्गु नेते असुन,त्यांनी यापूर्वी सांगली जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे चेअरमन म्हणून ही चार वेळा काम पाहिले आहे.तसेच घाटनांद्रे गावचे सरपंच म्हणून ही त्यांनी अगदी उठावदार काम केले आहे.त्यांनी घाटनांद्रे गावच्या विकासासाठीही मोठे योगदान दिले आहे.तसेच जिल्हा मजूर फेडरेशनवर काम करत आसता त्यांनी अगदी जिल्हाभर आपल्या कामाची व्याप्ती वाढली होती.अगदी सरळ व प्रामाणिक माणूस म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.