NC Times

NC Times

रोज सकाळी या वनस्पतीची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहील!!


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-  जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या जवळपास ७७ मिलियन लोक टाईप दोन मधुमेहाने ग्रस्त आहेत तर सुमारे २५ मिलियन लोक डायबेटीसने ग्रस्त आहेत याचा अर्थ त्यांना भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने मधुमेहावर कायमस्वरूपी इलाज नाही आणि म्हणूनच तो आटोक्यात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह हा शरीराच्या अनेक अवयवांना इजा पोहोचवू शकतो तसेच तो मृत्यूला कारणीभूतही ठरू शकतो. मधुमेहाच्या समस्येपासून आपण बचाव करण्यासाठी चांगल्या आहाराचा समावेश करायला हवा. ज्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थाचे सेवन करायला हवा. मधुमेहाच्या रुग्णासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. जे औषधांसोबत वापरल्यास फायदेशीर ठरू शकतात. त्यापैकी एक उपाय म्हणजे आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या वनस्पती. या वनस्पतीचा वापर आपण रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी करू शकतो. तर कोणत्या वनस्पतीची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते याबाबतची माहिती जाणून घेऊया.
कडुलिंबाची पानेः- एनसीबीआयच्या अहवालानुसार, मधुमेहाची समस्या जाणवत असल्यास गोड कडूलिंबाची पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. पानांमध्ये असलेले फायबर पचन प्रक्रिया मंदावते आणि चयापचय गतिमान करत नाही, ज्यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
तुळशीची पानेः- तुळस ही आयुर्वेदातील सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पती मानले जाते या वनस्पतीला धार्मिक महत्त्व आहेच. शिवाय तिच्यामध्ये अनेक गंभीर रोगाशी लढण्याची क्षमता आहे.  मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे पान पाण्यात उकळून प्यावे. तुळशीच्या पानाचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो.
इन्सुलिन वनस्पतीः- मधुमेहाच्या रुग्णासाठी इन्सुलिन (कॉस्टस इग्नियस/इन्सुलिन प्लांट लीव्हस)एखाद्या औषधांसारख काम करते. एनसीबी आयच्या संशोधनानुसार या पानाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. या वनस्पतीच्या पानाचे सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित राहते.
आंब्याचे पानेः- आंब्याच्या पानांमध्ये एक्झाइम मॅगीफेरीन असते. ज्यामध्ये अल्फा- ग्लुकोसिडेस  रोखण्याची क्षमता असते, जे स्वादुपिंडातील कार्बोहायड्रेट चयापचय कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते. आंब्याच्या पानांमध्ये इन्सुलिन वाढवण्याची आणि ग्लुकोज नियंत्रित करण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटँमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते हे दोन्ही मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल साठी फायदेशीर असतात.
पेरूची पानेः- पेरूच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. तसेच पेरूच्या पानाचा रस अल्फा ग्लुकोसिडेसची क्रिया रोखू शकतो. तर पेरूची पाने गरम पाण्यात उकळवून चहा म्हणून ही पिऊ शकता. संकलनः- डॉ.अरुण राजपुरे वाई