नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि कोलकत्ता येथील डॉक्टरांच्या घटनेच्या निषेधार्थ आज आपण हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवून बंद मागे घेऊन बदलापूर येथे झाले झालेल्या घटनेचा मूक मोर्चा काढून तीव्र निषेध केला.
देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून पीडितांना योग्य न्याय मिळावा आणि कठोरातील कठोर शिक्षा गुन्हेगारांना व्हावी यासाठी आपण संवेदनशील मार्गाने निषेध मोर्चा काढला.
यावेळी उपस्थित शेखर(भाऊ) निचळ,तालुकाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),आटपाडी तालुका.सचिन गुरव युवा नेते काँग्रेस, मोहन (अध्यक्ष) शिंदे शिवसेना विभाग प्रमुख, शशिकांत देठे माजी व्हा.चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, राहुल रमेश गुरव ग्रामपंचायत सदस्य खरसुंडी, विवेक पुजारी युवा नेते खरसुंडी, दिलीप निवृत्ती पाटील कॉन्ट्रॅक्टर चिंचाळे, राहुल शिंदे, अभिजीत पुजारी, श्रीकांत देशमुख, बाबुराव जाधव, अमोल शिंदे, प्रदीप शिंदे, प्रीतम शिंत्रे, अमोल खैरवाड, पंपू मेटकरी, आणि खरसुंडी गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.