या कार्यक्रमावेळी जतचे आमदार विक्रमसिंह दादा सावंत म्हणाले की , समाजाच्या विविध घटकांशी संवाद साधण्याचा आणि त्यांच्या विचारांना समजून घेण्याची संधी मिळाली.बंजारा समाजाच्या विकासासाठी शासनाने तत्परतेने वेगाने पावले उचलली पाहिजेत, मात्र तसे होताना दिसत नाही.
तांडा सुधार योजना अंमलात आणून प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इ. भौतिक सोयीसुविधा तसेच शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांसारख्या सुविधाही पुरवल्या गेल्या पाहिजेत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता ठोस उपाययोजना केली गेल्यास बंजारा समाज तसेच भटक्या विमुक्त जाती जमातीतील घटकांचा विकास वेगाने होण्यास सहाय्यभूत ठरेल. आगामी काळात शासन दरबारी पाठपुरावा करू आणि समाज बांधवांना सर्वोतोपरी मदत करेल अशी ग्वाही देतो. या प्रसंगी माझ्या समवेत खासदार विशालदादा पाटील, आ. विश्वजित कदम साहेब, आ.राजेश राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.