NC Times

NC Times

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव कुलकर्णी यांना उमेदवारी द्यावी,मनसेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांची पक्षनिरीक्षकाडे एकमुखी मागणी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- स्वच्छ प्रतिमा,दांडगा जनसंपर्क व निष्ठावंत कार्यकर्ता असणाऱ्या वैभवदादा कुलकर्णी यांनाच तासगाव-कवठेमहंकाळ विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी मतदारसंघांतील कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी पक्ष निरीक्षकाकडे केली.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       कवठेमहांकाळ येथील 'सुमधुर' मंगल कार्यालयात मनसेचे सरचिटणीस तथा तासगाव-कवठेमहंकाळ विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक योगेश परुळेकर यांच्या उपस्थित पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही मागणी करण्यात आली.अगदी पक्ष स्थापनेपासूनच वैभव कुलकर्णी यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. उदयोन्मुख नेतृत्व व मनसे विद्यार्थी सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव (दादा) कुलकर्णी यांनी जनमानसात, समाजकार्यात व राजकीय क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
      आत्मविश्वास व अभ्यासपूर्वक संवाद,प्रभावी वक्तृत्व,अगदी तळागळा पर्यंत दांडगा जनसंपर्क,संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जनसंपर्काचे मोठे जाळे,दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आणि नित्य संपर्कातून कार्यकर्ते जोडण्याची कला यातूनच वैभव कुलकर्णी यांचे नेतृत्व घडले असून सुसंस्कृत,निर्व्यसनी,सुशिक्षित त्याचबरोबर नेतृत्व,वक्तृत्व आणि कर्तृत्व या तिन्हींचा संगम असणाऱ्या वैभव कुलकर्णी यांना आगामी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मनसेकडून लढवावी अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निरिक्षकांकडे मागणी केली.
            यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष वैभव कुलकर्णी म्हणाले,वर्षानुवर्षे चालत आलेला भष्टाचार,प्रशासनाचा अंदाधुंद कारभार,वाढती गुंडगिरी,कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला गोंधळ, यासर्व गोष्टींना मतदारसंघातील नागरिक कंटाळलेले आहेत. खोटी आश्वासने ऐकून सर्वसामान्य नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत.प्रस्थापित राजकारण्यांनी मतदारसंघांच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रगतीवर अगदी जादा भर त्यांनी दिला आहे.पक्षाची संघटनात्मक बांधणी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेत पूर्ण झालेली असून हा मतदारसंघ निवडणूक लढवण्यास योग्य आहे.तसा आदेश पक्षाच्या वतीने आल्यास पूर्ण ताकदीने विधानसभा लढवू आणि त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास वैभव कुलकर्णी यांनी यावेळी निरीक्षकांना दिला.
     यावेळी पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनीही कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पक्षाची बांधणी चांगली करा,लवकरच राज साहेबांचा दौरा सांगलीला होणार आहे.त्यासाठी तुम्हाला जोरदार तयारी करावी लागेल असे मत व्यक्त केेले.
     यावेळी राज्य उपाध्यक्ष महेश चितलांगे,जय शृंगारपुरे,जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी देखील आपली मते व्यक्त केली.प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी तर आभार तालुकाध्यक्ष कुमार जाधव यांनी मानले.मेळाव्याचे नियोजन तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केले होते.यावेळी  तालुका उपाध्यक्ष अधिकराव पोळ,चंद्रकांत मंडले,महिला आघाडी तालुकाध्यक्ष दिपाली पुंडेकर,शहर अध्यक्ष आकाश तेली,पै रोहित तेली,महेश साबळे,कृष्णा पोपळघट,लक्ष्मण पाटील,शामराव पाटील,रुपाली पोतदार,अर्चना मोरे,रोशनी जावळे,अनिता अवताडेसह अनेक आजी,माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,मतदारसंघात सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोकप्रतिनिधीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.