नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी येथील एकुंडी ते अनंतपुर हा दोन किलोमीटर रस्ता अनेक दिवसापासून कच्चाच राहिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक सरकारी बदलली पण शासनातर्फे या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. परंतु एकुंडीचे माजी लोकनियुक्त सरपंच तथा भाजपा नेते बसवराज पाटील यांनी अनेक वर्षापासून या रस्त्याचा पाठपुरावा करून हा रस्ता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग सुरक्षा महामंडळचे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या माध्यमातून सरपंच बसवराज पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाठपुरावा करून हा रस्ता मंजुरीसाठी मोठा प्रयत्न केला आहे. लवकरच या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू होईल व या रस्त्यारील वाहतूकदारांचे व प्रवाशांचे अडचण दूर होईल असे पत्रकारांशी बोलताना बसवराज पाटील यांनी सांगितले.