नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- दिघंची-हेरवाड राज्यमार्गावर तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथील बसस्टँड दरम्याने असणारा मुख्य चौक हा अपघाताचा सापळा बनला असून,येथे लहान-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहेत.त्यामुळे अनेकजण जायबंद झाले आहेत.याबाबत संबंधित विभागाकडे वारोंवार मागणी करुनही त्यांचे डोळे उघडत नसतील तर आम्हा गावकऱ्यांना नाविलाजास्तव आंदोलनाचे शस्त्र हाती घ्यावे लागेल तेव्हा येत्या आठ दिवसात येथे स्पीडबेकर न बसविल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल अशा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
याबाबत बोलताना पाटील पुढे म्हणाले की दिघंची-हेरवाड राज्य महामार्ग हा तिसंगी गावाच्या अगदी मध्यातून कार्यालय,हायस्कूल,जिल्हा परिषद शाळा,पोस्ट आरोग्य केंद्र,जनावरांचा दवाखाना,अंगणवाडी त्याचबरोबर बहुतांश गावकऱ्यांच्या शेत्या व वस्त्या या सदर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्याने येथे नेहमी लोकांची व शालेय विद्यार्थ्यांची ये-जा असते.मुळात हा चौकच वर्दळीचा आहे.हा रस्ताच राज्यमार्ग असल्याने येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची नेहमी ये-जा असते.
त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहे.यामुळे अनेक जण जायबंद झाले आहेत.याबाबत वारोंवार संबंधित विभागाला मागणी करुनही चांगले जाणीवपूर्वकच दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे सदर ठिकाणी आठ दिवसात स्पीडबेकर न बसविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आसा स्पष्ट इशारा प्रफुल्ल कुमार पाटील यांनी दिला आहे.