NC Times

NC Times

एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्याच्या प्रवाहात वाहून घेल्याची धक्कादायक घटना


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)- एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली होती. यापैकी दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येता आल्याने त्यांचे प्राण बचावले. परंतु चार लहान मुलांसह एक महिला दुर्दैवाने वाहून गेली. तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले. रविवारी थांबवलेले बचावकार्य सोमवारी सकाळी पुन्हा सुरु झाले, मात्र दोघे जण अद्यापही बेपत्ता आहेत. लग्नानिमित्त आग्य्राहून पुण्यात आलेल्या अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नातेवाईकाने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
नातेवाईकांनी काय सांगितलं?
लग्नसोहळ्यासाठी अन्सारी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र आले होते. २७ तारखेला लग्न झालं. गुलजार अन्सारी यांचे तारिक अन्सारीसोबत लग्न झाले. त्यानंतर दोन दिवसांपासून सगळ्यांचं पावसाळी पिकनिकचं प्लॅनिंग सुरु होतं. रविवार ३० तारखेच्या सकाळी सर्व जण भुशी डॅम परिसरात आले. ते एकूण १७ जण होते, टेम्पो ट्रॅव्हलरने सगळे जण आले होते, अशी माहिती त्यांच्या एका नातेवाईकाने दिली.
लहान मुलं वाहून गेली शोधकार्य चालू आहे तरीपण मिळत नाहीयेत
मौलाना अन्सारी यांच्या दोन मुली आणि मेव्हणी नूर शाहिस्ता अन्सारी यांच्यासह काही जण भुशी डॅम येथे गेले. फिरायला आलेल्यांपैकी ९-१० जण धबधब्याच्या पाण्यात उतरले होते. आमचा भाऊ बाहेर आला, त्यानंतर पाण्याचा प्रवाह लगेच वाढला. त्यामुळे बाकीचे जण अडकले. मला दुपारी दोन वाजता भावाचा फोन आला, लहान मुलं वाहून गेली आणि मिळत नाहीयेत.. माझ्यासाठी हे खूपच शॉकिंग होतं, मी खूप घाबरलो, लगेचच गाडी काढून निघालो, पण येईपर्यंत दोन तास लागले,
नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३५), अमिना अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६) आणि अदनान अन्सारी (वय ४, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) अशी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या पाच जणांची नावे आहेत.