नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)- काल रात्री दिघंची येथे मानगंगा नदीवरील पूल शेजारी असणाऱ्या नदीपात्रामध्ये एक चार चाकी अशोक लेलँन्ड आणि एक नवीन महिंद्रा 575 टँक्टर ने बेकायदेशीर वाळू उपसा करताना आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे,मंडळ अधिकारी संजय भोंगळे, मनोज शिरसे ,कमल मुलांनी,तलाठी आमिर मुल्ला शेषराव मुंडे, संतोष पवार श्री कांबळे, साळुंखे, विनायक पाटील,श्री बजबळे, निकम,तसेच कोतवाल शिवाजी पुसवळे गोरख जावीर गणेश कांबळे आदी कर्मचाऱ्यांनी नदीपात्रामध्ये जावून कारवाई केली.दिघंची चौकामध्ये जवळपास 15 ते 20 वाळू चोर गोळा झाल्यामुळे तात्काळ पोलिसांना प्राचारण करण्यात आले.
112 ला कॉल केल्यानंतर तात्काळ पोलीस गाडी तिथे 15 ते 20 मिनिटांमध्ये उपस्थित झाली.अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त तसेच महसूलच्या 15 ते 20 लोकांनी एकत्रित कारवाई केल्यामुळे दिघंची परिसरात वाळू चोरीचे प्रमाणात लगाम बसल्याचे बोलले जात आहे.