NC Times

NC Times

महानिबंध महास्पर्धेत कवठेमहांकाळचे प्रा दादासाहेब ढेरे द्वितीय तर ते ३ लाखाच्या बक्षीसाचे मानकरी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच  कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या महानिबंध स्पर्धेत  कवठेमहांकाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असुन यामध्ये त्यांना तीन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्यावतीने सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन,कार्य आणि विचार या विषयावरील आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल  कोल्हापूर येथे शनिवारी जाहीर करण्यात आला. 
 या स्पर्धेमध्ये पाचगणी येथील प्राचार्य डॉ सतिश देसाई यांचा या निबंध स्पर्धतनिबंध प्रथम क्रमांक आला असून,त्यांना प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस ५ लाख रुपयांचे जाहीर करण्यात आले.की ज्यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके यांचा समावेश आहे.तर कवठेमहंकाळ येथील प्रा दादासाहेब ढेरे यांचा या महानिबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला असून,त्यांना तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.की ज्यामध्ये पन्नास हजार रुपये रोख तर अडीच लाखांची पुस्तके यांचा समावेश आहे.सदर महानिबंध महास्पर्धेत एकुण २० स्पर्धकांची उत्तेजनार्थ बक्षीस विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. 
 बक्षीस वितरण समारंभ दि ९ जून रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवना मध्ये दुपारी एक वाजता होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.उत्तेजनार्थ बक्षीस विजेते स्पर्धक हे पुढीलप्रमाणे 
 डॉ सोमनाथ माने,तुकाराम कोले,नामदेव कोकाटे,सत्यजित पाटील,आरती साठे,समीर मुल्ला, सचिन पोकळे,गोपाळ शेळके,स्वप्निल जाधव,उमेश कल्याणी,पांडुरंग कदम,माणिकराव माळी, सूर्यकांत डोंगरे,राजेश पाटील,श्वेता कांबळे,मृण्मयी गायकवाड,डॉ स्वप्नाली जोग,अशोक पाटील,सारिका देशमुख,मनिष कुलकर्णी या स्पर्धकांचा समावेश असुन,त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये असा बक्षीसाच समावेश आहे.ज्यामध्ये एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके मिळणार आहेत.