NC Times

NC Times

लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी महायुतीची सावध भूमिका जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा फटका बसल्यानंतर महायुतीनं विधानसभेची चाचपणी चालु केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपाला बराच विलंब लागला. त्याचा फटका उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले प्रचारासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्यानं अनेक उमेदवार मताधिक्य घटले. त्याचा परिणाम निकालात दिसला. विधानसभेला ही चूक टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती पत्रकाराच्या हाती मिळाले आहे. .
महायुती मधील मोठ्या भावाच्या भुमीकेत असलेले असलेला भाजप राज्यातील २८८ पैकी १५५ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. शिंदेसेनेला ६० ते ६५ जागा मिळू शकतात. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५० ते ५५ सुटू शकतात. महायुतीमधील लहान पक्षांना १५ जागा सोडल्या जाऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर एकनाथ शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट आक्रमक झाली आहे.
दादा गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेला ८० ते ९० जागांची मागणी केली आहे. तर शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणातून १०० जागांची मागणी केली. जागा वाटपास झालेला उशीर, त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यास झालेला विलंब, जाहीर केलेले उमेदवार बदलले गेल्यानं शिवसेनेचं नुकसान झाल्याचं कदम म्हणाले. त्यांनी मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला.
महायुतीच्या जागावाटपाच्या संभाव्य फॉर्म्युल्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी भाष्य केलं. 'माझ्या माहितीनुसार अजित पवार गटाची बैठक झाली. अजित पवार गटातील निम्यापेक्षा जास्त आमदारांनी महायुतीत बाहेर पडण्याची भूमिका मांडली आहे,' असा खळबळ दानवेंनी केला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अजित पवारांचा पक्ष एकटा पडल्याचं चित्र दिसत आहे. संघाच्या मुखपत्रानं राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीच्या निर्णयावर टिकेची झोड उठवली. तर शिंदेसेनेनंही आपल्या उमेदवारांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याचा नेमका काय फायदा झाला, असा प्रश्न भाजप, शिंदे सेनेचे नेते अंतर्गत बैठकांमध्ये सुरु असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.