नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/ वार्ताहर (जालिंदर शिंदे)- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक श्रीमती शांताबाई सिताराम देसाई (वय-८५) यांचे वृद्धापकाळाने बुधवार दिनांक १ रोजी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले.त्या तंत्र कारागीर बाळासाहेब देसाई यांच्या आई होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सुन,जावाई व नातवंडे असा परिवार असुन,रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक ३ रोजी सकाळी ८ वाजता घाटनांद्रे येथे घेण्यात आले आहे.
घाटनांद्रे येथील श्रीमती शांताबाई सिताराम देसाई यांचे दुःखद निधन
May 03, 2024