NC Times

NC Times

सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग मँथेमँटिक्स या क्षेत्रात जास्तीत जास्त मुलींनी प्रवेश घ्यावा- ईशा अंबानी


नवचैतन्य टाईम्स नवी दिल्ली (प्रतिनिधी)- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानीने इतर क्षेत्राप्रमाणे इथे ही स्त्री-पुरूष समानता असली पाहीजे असे मत तिने बुधवारी झालेल्या एका मुलाखतीत मांडले. दूरसंचार विभागातर्फे आयोजित 'गर्ल्स इन आयसीटी इंडिया-२०२४' या कार्यक्रमात बोलताना मुलींना करिअर म्हणून तंत्रज्ञानाची निवड करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे असे विचार व्यक्त केले आहेत.
 भारताला अग्रेसर व्हायचे असेल तर जास्तीत जास्त मुलींनी स्टेम (STEM science, technology, engineering, and math) (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, मॅथेमॅटिक्स) या क्षेत्रात प्रवेश केला पाहिजे आणि करिअर म्हणून तंत्रज्ञानाची निवड केली पाहिजे, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका इशा अंबानी यांनी व्यक्त केले.
 मोदीचे केले कौतुक
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे डिजिटल क्रांती घडून आली असून ती समाजाच्या प्रत्येक पैलूत पसरली आहे. कम्युनिकेशन्स, एज्युकेशन आणि हेल्थकेअरपासून ते बिझनेस अँड फायनान्सपर्यंत तंत्रज्ञानाची परिवर्तनशील शक्ती दिसून येते, असे इशा म्हणाली. त्यांच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सरकार आवश्यक त्या सुधारणा करत आहे आणि त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. गेल्या दशकभरात तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे प्रतिनिधित्व ६ टक्क्यांनी वाढले असले तरी उद्योगांनाही हातभार लावावा लागणार आहे. महिलांच्या करिअरमध्ये शाश्वती आणण्यासाठी त्यांना मार्ग शोधावे लागतील. आपण मिळून असे भविष्य घडवू शकतो जिथे आपल्या मुलींना वरच्या पदावर राहण्याच्या समान संधी मिळतील,असं ही ईशा म्हणाली.
महिलांना प्रोत्साहन द्यायाला हवे
नीता अंबानी यांच्याबद्दल सांगताना ती म्हणाली, आई वारंवार सांगते “जर माणूस सक्षम झाला तर तो कुटुंबाचे पोट भरेल. जेव्हा एक स्त्री सक्षम होईल, तेव्हा ती संपूर्ण गावाचे पोट भरेल.” माझा आईने सांगितलेल्या या वाक्यावर माझा ठाम विश्वास आहे. महिला कर्मचाऱ्यांना करिअरच्या सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ कागदावर वैविध्य आणि सर्वसमावेशकता दाखवून बदल घडून येणार नाहीत. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी महिला लोकसंख्येचे समान योगदान असणे आवश्यक आहे. महिलांना या क्षेत्रात पूर्णपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करून आम्ही केवळ लिंगभेद कमी करत नसून विकासाला चालना देणाऱ्या सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण क्षमताही वाढवत आहोत.