NC Times

NC Times

मदतीची मागणी करताच लग्नाला न आल्याच्या रागातून घडली खळबळजनक घटना


नवचैतन्य टाईम्स  वर्धा (प्रतिनिधी)-दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नाला न आल्याच्या रागातून मामेभावावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी वर्ध्याच्या दत्तपुरात घडली. हल्लेखोर आतेभावाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर जखमीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हर्षल झाडे रा. नालवाडी असे गोळीबारातील जखमीचे तर राहुल वाघमारे रा. रेहकी (सेलू) असे हल्लेखोराचे नाव आहे. टपाल कार्यालयात नोकरीला असलेला हर्षल हा दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राहुलच्या लग्नाला गेला नाही. यावरून दोघांमधील संवाद थांबला. सोमवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान राहुल अचानक हर्षलच्या घरी आला. त्याला घराबाहेर बोलविले. साखरेचे पोते रस्त्यावर पडले
मदतीच्या अपेक्षेने हर्षल हा राहुलच्या मदतीसाठी धावून गेला. गाडीवर बसून दोघेही दत्तपूरजवळील बायपासवर आले. पण, राहुलने खिशातील गावठी पिस्तुल काढून हर्षलवर गोळी झाडली. पायाला गोळी लागल्याने हर्षल जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागला. याचवेळी राहुलने दुसरी गोळीही झाडली. ही गोळी हुकल्याने हर्षल रस्त्यावर आला. लग्न समारंभातील लोक धावून आले. त्यांनी सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. सेवाग्राम पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले असून अधिक तपास ठाणेदार विनित घागे करीत आहेत.