NC Times

NC Times

अभिनेत्री सुप्रिया पाठारेची तीन महिने केलेलं किडनॅप बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुटका


नवचैतन्य  टाईम्स मुंबई  प्रतिनिधी                (एस.डी.कदम)-ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत गोड माईची भूमिका साकारुन अभिनेत्री सुप्रिया पाठारे घरोघरी लोकप्रिय झाल्या. या भूमिकेशिवाय ही त्यांनी यापूर्वी बऱ्याच भन्नाट कलाकृती सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सुप्रिया पाठारे आज त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत घडलेला एक भयंकर किस्सा जाणून घेऊ.
 एका मुलाखतीत सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं की, १९९५ मध्ये एक निर्माता चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथे तीन महिने त्याने मला डांबून ठेवलं. शूटिंगसाठी मी इथून एकटी गेली होती. हे तीन महिने बंदुकीची भिती दाखवून माझ्याकडून त्याने अभिनय करवून घेतला. त्याने मला कुटुंबियांशी फोनवरून बोलण्याची परवानगी दिली होती. पण, मराठीत बोलण्यास बंदी घातली होती. मात्र मी कशाप्रकारे तरी गुप्त भाषेचा प्रयोग करून माझ्या बहिणीला माझ्यावर ओढावलेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं.
 मग माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मदत मागितली. यानंतर राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. एक दिवस राजस्थान पोलिसांतील शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की बाळासाहेबांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातलं होतं. २० तासांचा प्रवास करुन मी सुखरूप सुरतला पोहोचले. याकरिता मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन.
 सुप्रिया पाठारे सध्या स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत सुप्रिया साध्याभोळ्या माईच्या भूमिकेत पाहायला मिळालेल्या पण आता या मालिकेत अगदी विरोधी पात्र त्या साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनय कौशल्याचे प्रेक्षकांकडूनही कौतुक होतंय.
सुप्रिया पाठारेंनी यापूर्वी जागो मोहन प्यारे, होणार सून मी या घरची, फू बाई फू, पिंजरा, मोलकरीणबाई यांसारख्या बऱ्याच मालिकेत त्या दिसलेल्या.