NC Times

NC Times

एक विचार माझ्या रामासाठी एक विचार रामनवमी साठी


नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा.सौ.सरस्वती(ताई) वाशिवले)-"प्रभाती राम चिंतिंत जावा"जीवनातील सर्व चिंता मिटवण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजेच राम नाम 
एक मुलगा म्हणून आदर्श पुत्र ,एक पती म्हणून एक वचनी एक पत्नी,एक भाऊ ,आणि एक प्रजाहित दक्ष राजा
काल प्रत्येक गावातील मंदिरात,घरात केलेला जयघोष 
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जन्म माहिती (श्रीराम नवमी)

भगवान मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम जंयती

रामनवमी हा चैत्र महिन्यातली शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस.

श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन्यन लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.

श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन्‌ लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.

हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा  मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरुपात प्रसिध्द आहेत.

१ - मत्स्य अवतार - माश्याच्या रूपातील अवतार 

२ - कूर्म अवतार - कासवाच्या रूपातील अवतार 

३ - वराह अवतार - डुकराच्या रूपातील अवतार 

४ - नृसिंह अवतार - अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे मानवाचे 

५ - वामन अवतार - बटूक ब्राह्मण रूपातील अवतार 

६ - परशुराम अवतार - ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार

७ - श्रीराम अवतार -  मर्यादा पुरुषोत्तम रूपातील अवतार 

८ - श्रीकृष्ण अवतार - १६ कला अवगत असलेला पूर्ण रूपातील अवतार 

९ - बुद्ध अवतार - क्षमा, शील, आणि शांती रूपातील अवतार

१० - कल्कि अवतार - ( हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे असे मानले गेले आहे ) सृष्टीच्या संहारक रुपात

श्रीराम अवतार

श्रीरामची जन्म तिथी व कुंडली

श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला.
माझ्या आजोबां ज्योतिष कै. लक्ष्मीकांतबुवा पुराणिक यांचा स्वहस्ते लिखीत श्रीरामची जन्म कुंडली ही दिली आहे 

श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या - कौसल्या, सुमित्रा अन्‌ कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.

श्रीराम हे श्रीरामायण ह्या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.

श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजाजनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला.

 भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.

मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.

ह्या आदर्श देवाताराची आपल्याला सदैव आठवण रहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.

श्रीराम ही सर्व अबाल वृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात. श्रीराम कथा ही जशी पावन तसेच प्रभू श्रीरामाचे नाव हे सुद्धा पापनाशक, संकट निवारक, भक्त रक्षक असे आहे. जर श्रीराम ह्या नाम लेखनाने पाण्यावर पाषाण तरले, तर श्रद्धा, भक्ती व निष्ठापूर्वक श्रीरामाचे नाम घेणारा नामधारक हा ह्या भवसागरी कां तरणार नाही? नक्कीच तरणार. मात्र त्यासाठी त्या श्रीरामाची मनःपूर्वक उपासना करायला हवी हे विसरून चालणार नाही.

जय श्रीराम 🙏