NC Times

NC Times

हार्ट अटॅक येऊ नये बीपीच्या गोळ्या कमी करणे शरीरातील 72 हजार नसा झटक्यात मोकळ्या होण्यासाठी या पाच पाकळ्या अशा खा....


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- सध्या बऱ्याच लोकांना हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब झाल्याने अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण असते हाय बीपी आणि त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना हृदयाचे ब्लॉकेजेस होतात. हे सामान्यपणे कोलेस्ट्रॉलमुळे घडून येतात. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात एक लो डेंसिटी कोलेस्ट्रॉल आणि हाय डेंसीटी कोलेस्ट्रॉल लो डेंसिटी कोलेस्ट्रॉल हे खराब स्वरूपाचे असते आणि हे खराब कोलेस्ट्रॉल जेव्हा धमणीत साचते तेव्हा धमण्या ब्लॉक होतात आणि ह्दयाला  रक्त येते ते रक्त येत नाही, याचे प्रमाण 50% च्या खाली असेल तर आपले काम सुरळीत चालते मात्र 50 टक्के पेक्षा जास्त वाढले तर धमन्या ब्लॉक होतात.                                                  परिणामी हृदयाला जे रक्त येते ते थांबल की अटॅक येण्याचे शक्यता असते. आणि अटॅक आल्यानंतर व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना अपचन गॅसेस पित्त हाता पायाला मुंग्या येणे अशक्तपणा थकवा सांधेदुखी या सर्व समस्या दूर करणारा साधा सोपा उपाय आहे.                                                       यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरी सहज उपलब्ध होते यासाठी पहिला घटक लागणार आहे लसूण आणि लसणाच्या पाकळ्या 100 ग्रॅम लसणामध्ये दीडशे ग्रॅम कॅलरीज सात ग्रॅम प्रोटीन विटामिन B1 B2 B3 B6 हे सर्व प्रकारचे बी चे विटामिन असतात. त्याचप्रमाणे विटामिन सी असतो आणि रक्त शुद्ध करण्यासाठी लागणारा पोलाईट घटक हा मोठ्या प्रमाणात असतो.                         सोडियम आणि झिंक ही मोठ्या प्रमाणात असते जे की पोट साफ करण्यासाठी उपयुक्त राहते. इम्युनिटी पावर वाढवते. लसणातील हे सर्व घटक रक्त गोठू देत नाहीत आणि त्याचप्रमाणे रक्तात असणारे खराब कोलेस्ट्रॉल वितळून ब्लॉकेजेस कमी करतात. ज्या व्यक्तींना रक्त शुद्ध करण्यासाठी वापरायचा आहे त्यांनी कच्चा लसूण खाल्ला तर खूप फायदा होतो. रक्तातील शुगर कमी करण्यासाठी अॉलीसीन नावाचा घटक लसणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.                                                                    रोज सकाळी उपाशीपोटी दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाऊन त्यावर पाणी पिला तर खूप फायदा होतो यामध्ये दुसरा घटक लागणार आहे तिळाचे तेल हे किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. 
 यामध्ये  लिनोलीक लि ऍसिड जे की रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते हे मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये मॅग्नेशियम भरपूर असते कॅल्शियम भरपूर असते जे हृदयाला बळकटी आणते रक्त पातळ करण्यासाठी व बीपी कंट्रोल करण्यासाठी हे तिळाचे तेल अत्यंत उपयुक्त आहे त्याचप्रमाणे हाडे देखील मजबूत होतात हे तेल साधारण एक चमचा घ्यायचे आहे सुरुवातीला एक चमचा तिळाचे तेल घ्या थोडे गरम झाले की त्यात पाच लसूण पाकळ्या टाका तुम्ही या लसूण पाकळ्या सोलून किंवा जशास तसे टाकू शकता एखाद्या व्यक्तीस तिळाचे तेल मिळाले नाही तर त्याविषयी एक कप दूध वापरा.                                                एक कप दुधामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या उकळाव्या त्यानंतर लसूण पाकळ्या आणि दूध खायचं आहे किंवा लसूण पाकळ्या खाऊन त्यावर दूध पिऊन घ्यावे जर एखाद्या व्यक्तीस दूध जमत नसेल तर अशा व्यक्तीने साधारणता एक कप पाणी प्यावे त्यामध्ये पाच लसूण पाकळ्या टाकाव्या पाच मिनिटे उकळावे.                त्यानंतर लसूण व पाणी दोन्हीही खावे आणि आपण तिळाच्या तेलामध्ये लसूण पाकळ्या लाल फ्राय करायच्या आहेत त्यानंतर लसूण पाकळ्या बाजूला काढून त्या आपल्याला चावून चावून खायचे आहेत व त्यावर ती एक ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे हा उपाय तीन वर्षापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत करू शकता एक महत्त्वाची गोष्ट हा उपाय केल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये.              मात्र अर्ध्या तासानंतर कोणता ना कोणता पदार्थाचे सेवन करायचे आहे सलग 21 दिवसानंतर याचे चांगले परिणाम दिसतील हातापायांच्या मुंग्या कमी होतील बीपी नॉर्मल राहील कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि अटॅक येण्याची शक्यता देखील त्याचप्रमाणे सांधेदुखी गुडघेदुखी देखील कमी होण्यास मदत होईल.