NC Times

NC Times

पत्नीच्या प्रेम प्रकरणामुळे पतीला राग अनावर झाल्याने बारामतीत तरुणाची दिवसाढवळ्या खून


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधातून बारामती येथील एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबेवाडी येथे घडली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी या प्रकरणी तपास करून तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संग्राम हनुमंत साळुंके (वय २२, रा. वडकेनगर, बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दोन डिसेंबर २०२३ रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली होती. सुरुवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन रेणुसे, आदित्य गवळी, अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम याचे आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती महिलेच्य़ा पतीला माहिती मिळाली. यानंतर संग्राम महिलेला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती तरुणीचा पती नितीन रेणुसेला मिळाली होती. या माहितीनुसार दोन डिसेंबर २०२३ रोजी आरोपींनी पळत ठेवून संग्रामला गाठले. यानंतर दुचाकीवर बसवून अप्पर परिसरातील एका गॅस गोदामाजवळ आणले आणि बेदम मारहाण केली. मारहाणीत संग्राम गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता; परंतु खुनामागचे कारण पोलिसांना समजू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
जबर मारहाणीमुळे मृत्यू
वैद्यकीय अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले. तपासात संग्रामवर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.