NC Times

NC Times

भाजपाच्या फसवाफसवीला पुन्हा बळी पडू नका -- विशालदादा पाटील.


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)  :- निवडणूक आली की खोटे आशवासन द्याची किंवा देशात एकादी भावनिक घटना घडवुन आणायची यासारखा एक कलमी कार्यक्रम राबवूनच भाजपाकडून निवडणुका लढल्या व जिंकल्या जात आहेत.त्यामुळे अशा प्रवृतीना वेळीच रोखले पाहिजे.अन्यथा देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय रहाणार नाही असे स्पष्ट मत प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष तथा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील यांनी आपल्या घाटमाथ्यावरील संपर्क दौर्या दरम्याने घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
       
यावेळी बोलताना विशालदादा पाटील पुढे म्हणाले की जर भाजप एवढी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे तर मग त्यांना शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्षा का फोडावे लागतात याचाही आपण सर्वांनी विचार केला पाहिजे.भाकरी नाही फिरविली तर करपते पण आज हीच भाकरी करपण्या पलीकडे गेल्याचे सांगुन.सता परिवर्तनासाठी सर्वांनी सज्ज रहाण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

            तत्पूर्वी त्यांनी कुची, जाखापुर,कुंडलापुर,वाघोली,गर्जेवाडी,तिसंगी गावातही बैठका घेऊन अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष संजय हजारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय पाटील,जेष्ठ नेते प्रा दादासाहेब ढेरे,कॉग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब शिंदे,कॉग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविराजे शिंदे,युवानेते विशालदादा शिंदे,सरपंच अमर शिंदे,सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद शिंदे,तिसंगीचे माजी सरपंच वामन कदम,गर्जेवाडीचे जेष्ठ नेते प्रल्हाद (बापू) हाक्के,विलास बोराडे,संजय प्रभाकर शिंदेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत सरपंच अमर शिंदे यांनी केले तर आभार चेअरमन प्रल्हाद  आण्णा) शिंदे यांनी मानले.