NC Times

NC Times

साहित्यिक, पत्रकार कविराज अमोल मांढरे.यांची उत्तुंग गरूड झेप.


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) वाई.20.जानेवारी.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यकार कविराज अमोल मांढरे...वाई. जिल्हा सातारा. यांनी आपल्या लेखनातून साहित्य क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा साहित्य प्रवास बर्‍याच वर्षाच्या संघर्षाचा आहे. बारावी सायन्स मध्ये अपयश आल्यानंतर सुद्धा नैराश्य सोडून यशाला खेचून आणण्याची क्षमता आपल्यातही आहे हे मनात ठसवून त्यांनी जिद्दीने व आपल्या परिश्रमाने साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आत्तापर्यंत सुमारे ऐंशी कवी संमेलनातून विविध सामाजिक प्रश्नांवर समाजप्रबोधनाचे काम केलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातल्या वृत्तपत्र मासिक व पोर्टल द्वारे विविध विषयांवर आपले मत मांडले आहे. व्यसनमुक्ती, नापास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ,आदर्श गणेश उत्सव ,युवकांनी संघटित व्हावे ,गाव तेथे ग्रंथालय ,आपला बळीराजा आणि वीर जवानांचे महात्म्य, क्रिकेट बरोबर इतर खेळांनाही प्रोत्साहन द्यावे ,स्पर्धा परीक्षांचे महत्व ,त्याचबरोबर शासनाची जबाबदारी, परराष्ट्र धोरण, आणि कोरो नाबद्दल जनजागृती, लॉक डाऊन मध्ये खास विद्यार्थ्यांशी हितगुज, लोकसहभागातूनच कोरो ना चीसमस्या सुटेल, आणि मराठी पाऊल पडते पुढे ,दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र ,आई थोर तुझे उपकार, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगासमोर एक आदर्श, लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,अशा विविध विषयांमधील स्वतःच्या कौशल्य द्वारे आणि लेखणीने साहित्यक्षेत्रात एका उंचीवर स्वतःचे नाव पोचलेले आहे. आणि महत्वाचे म्हणजे आपले या वृत्तपत्राशी जोडल्या गेल्याबद्दल त्यांना विशेष असा एक पत्रकार म्हणून अभिमान आहे. या आपल्या पत्रकार परिवारात त्यांना त्यांच्या कलेला सर्वांनी दाद देऊन एक पत्रकार म्हणून स्वतःची अशी एक वेगळी ओळख त्यांनी नक्कीच निर्माण केलेली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे पुणे येथील एका साप्ताहिकात द्वारे ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तम मार्गदर्शन करीत आहेत.यांच्या या साहित्य क्षेत्रातील उत्तम योगदानामुळेच त्यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार, शिवजयंती महोत्सव पुणे ,राज्यस्तरीय माझी माई पुरस्कार, स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार, छंदोगामात्य सन्मान, मी भारतीय राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ,राज्यस्तरीय आदर्श कलारत्न पुरस्कार,लिटरेचर अवॉर्ड 2023,, बेस्ट राईटर अवॉर्ड,  त्याचबरोबरच नुकताच पुणे येथे त्यांना साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल मातृरक्षा सन्मान देण्यात आला.अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील सहकाराचा एक आदर्श असा असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे कार्यरत आहेत. कोरो ना संकटातही सर्वसामान्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी मदत कार्य करणाऱ्या अशा त्या बँकेचा त्यांना एक विशिष्ट अभिमान आहे. आणि या आपल्या बँकेच्या परिवारातील एक सदस्य म्हणूनच त्यांनी आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विविध वृत्तपत्रातून उत्तम लेखन केलेले आहे...
तसेच ते मराठी साहित्य क्षेत्रात बरोबरच आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात ,छत्तीसगड , बिहार, मध्य प्रदेश ,कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यातील हिंदी साहित्य संस्थान  बरोबर ते हिंदी साहित्य शेत्रात मुशाफिरी करत आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत. साहित्यरत्न सन्मान, राष्ट्र गौरव लेखन सन्मान,. हिंदी साहित्य दिनकर सन्मान .असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांची अनेक राष्ट्रीय हिंदी काव्यसंग्रहात ही उस्फुर्त सहभाग आहे. तसेच त्यांनी नुकताच अमेरिका येथील आपल्या एका भारतीय हिंदी साप्ताहिक का मध्येही नया भारत, हिंदुस्तानी कवी, कहानी एक साहित्य पत्रकार की, आदर्श स्वराज्य, वृक्ष लागवड करे भविष्य बनाये, भारतीय संस्कृती एक आदर्श. अपने विद्यार्थी वर्गने भारत देश को महासत्ता बनाये., भारत वर्षे दुनिया मे विश्वगुरू की नई पहचान.या लेखाद्वारे सातासमुद्रापार ही आपली विशिष्ट अशी ओळख निर्माण केलेली आहे त्याचबरोबर किसन वीर कॉलेज वाई येथे त्यांचा माजी विद्यार्थी म्हणून साहित्य क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल कॉलेजचे प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार झाला. त्याचबरोबर कवठे तालुका वाई येथील माध्यमिक शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना समाज प्रबोधन पर मार्गदर्शन केले. तिथेही त्या शाळेचे ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सन्मानित केले. त्याचबरोबर पाचगणी येथील सर आईन्स्टाईन ॲकॅडमी या शाळेमध्ये ही त्यांना निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित केले. आणि विशेष म्हणजे पुणे येथील  स्पर्धा परीक्षांना अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या लेखनातून योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत. यामुळेच भविष्यात साहित्य क्षेत्रात अजून नव्या उमेदीने काम करण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळेल हा त्यांचा मानस आहे.. आणि शिक्षण म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक वाघिणीचे दूध च आहे आणि त्याचे फळ हे त्यांना जीवनात नक्कीच मिळते असा विचार ते मांडतात.. तसेच भविष्यातही आपले पाय जमिनीवरच ठेवून समाजातील साहित्यप्रेमी ,थोरांचा आशीर्वाद आणि मित्र परिवाराच्या सहाय्याने साहित्यक्षेत्रात आपल्या लेखणीने समाजप्रबोधनाचे काम निपक्ष व निर्भीडपणे चालूच ठेवतील असा त्यांचा विश्वास आहे. धन्यवाद.
. जय महाराष्ट्र.
कविराज अमोल मांढरे.वाई.जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.
 
.