आटपाडी येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनी 75 दिव्यांग बंधू-भगिनी यांना महिन्याला 35 किलो धान्य मिळणाऱ्या अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेत समावेश करून ई रेशन कार्ड चे वाटप तहसीलदार सागर ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले मात्र शासनाच्या योजनेचा लाभ फक्त बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सदस्यांना देण्यात आला असल्याचा आरोप दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आल्ताप काझी यांनी केला आहे. तहसीलदार सागर ढवळे यांच्या या भेदभाव झाल्याचा निषेधार्थ संघटनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा काझी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे